ग्रामस्थांना वैद्यकिय सेवा जर परवडणार्‍या दरात उपलब्ध करुन दिल्या तर हा प्रश्न बर्‍यापैकी सुटू शकेल असा विश्वास वाटतो.

सरकारने याबाबतीत अनेक योजना सुरु केल्या आहेत. पण त्या मुख्यत्वे मोठ्या प्रकारच्या आजारासाठी/शस्त्रक्रियांसाठी आहेत. मेडिक्लेम सारख्या योजना रुग्णालयात अ‍ॅडमिट झाल्यानंतर लागू होतात. परंतु लहानसहान आजारासाठी अशी एकही योजना कार्यन्वित नाही.

नगरपालिका/महानगरपालिका हद्दींमध्ये त्यांच्या हद्दींमध्ये रुग्णालये चालू केली जातात. जिल्ह्याच्या ठिकाणी राज्य सरकारतर्फे रुग्णालये चालवली जातात. जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्रे चालवली जातात. त्याचे प्रमाण साधारणत: 10 गावांमध्ये एक असे असते. बर्‍याचवेळा जाण्या-येण्याचे अंतर, त्यासाठी येणार खर्च परवडण्यासारखा नसतो. औषधांचा तुटवडा, सार्वजनिक सुट्ट्या अशा अनेक कारणांनी प्राथमिक आरोग्य केंद्र समाजातील ही त्रुटी भरुन काढू शकत नाही. त्यामूळे संस्थेने हा उपक्रम हाती घेण्याचे ठरवले.

सावली योजना: